जगाला कमी ज्ञात असतील अशा भारताबद्दलच्या कोणत्या गोष्टी आहेत?
मी काही गोष्टी सांगतो ज्या पूर्ण जगाला काय, अर्ध्या भारतीयांना पण “भारताबद्दल” माहित नसतील. १. एकूण १२ जोतीर्लींगापैकी सर्वांत प्रथम असलेले गुजरात मधील सोमनाथ. इथे एक अतिशय विशाल स्तंभ आहे ज्याला “बाण स्तंभ”म्हटलं आहे. ज्यावर कोरले आहे, "आसमुद्रान्त दक्षिण ध्रुव पर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग ". ह्या बिंदुपासून जर आपण दक्षिण धृवापर्यंत एक सरळ रेषा आखली तर ती रेषा कुठल्याच जमिनीला छेदत नाही. म्हणजे त्या स्तंभापासून दक्षिण धृव्पर्यंत फक्त पाणीच आहे. आणि हे मंदिर जवळपास ७ व्या शतकातले आहे, जगाचा संपूर्ण नकाशा तयार होण्याचा कित्येक अगोदर. [1] 2. आर्यभट्ट ह्यांनी एका ठराविक तर्यापर्यंत आपली पृथ्वी स्वताभावती आणि सूर्याभोवती फिरून परत यायला किती वेळ लागतो तो मोजला होता. तो त्यांनी २३ तास, ५६ मिनिट आणि ४.०१ सेकंद असा काढला होता म्हणजे एक दिवस जवळपास. सध्याची हीच किंमत नवीन विज्ञानाने काढली ती आहे २३ तास, ५६ मिनिट आणि ४.०९१ सेकंद. तसेच पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला ३६५ दिवस, ६ तास, १२ मिनिट आणि ३० सेकंद (३६५.२५८५८ दिवस) लागतात अस त्यांनी मोजलेले. हीच किम्मत आता मोजलेल...